हार्दिक पांड्याला झटका बसण्याची शक्यता, मुंबई इंडियन्स रोहित शर्मासह ’या’ खेळाडूंना कायम ठेवू शकते
मुंबई,
इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामात म्हणजे आयपीएल 2022 मध्ये एकूण 10 संघ सहभागी होतील. लखनौ आणि अहमदाबादच्या रूपाने दोन नवीन संघ जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये सामील झाले आहेत. आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी एक मेगा लिलाव आहे. रिपोर्टनुसार, आयपीएल 2022 चा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. यापूर्वी आयपीएलच्या नियमांनुसार सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार होती. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा, अष्टपैलू किरॉन पोलार्ड आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवू शकते. दुसरीकडे, हार्दिक पांड्याला फ्रेंचायझी लिलाव पूलमध्ये पाठवण्याची शक्यता आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सच्या ’कोअर’ खेळाडूंमधून हार्दिक पांड्या बाहेर होऊ शकतो. तो गेल्या काही काळापासून स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळत आहे. खेळाडूंना कायम ठेवण्याशी संबंधित एका वरिष्ठ आयपीएल अधिकार्याने सांगितले की, ‘मला वाटते की बीसीसीआयमध्ये राईट-टू-मॅच फॉर्म्युला असेल (ींऊश् म्हणजे दुसर्या संघाच्या बोलीच्या बरोबरीच्या रकमेसाठी खेळाडूला संघात समाविष्ट करण्याचा अधिकार). जर ींऊश् नसेल तर चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. रोहित शर्मा आणि भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाची पहिली पसंती असेल. किरॉन पोलार्ड संघाची तिसरी पसंती असेल. या संघाची ताकद कामगिरीतील सातत्य असून हे तिघेही त्याचे आधारस्तंभ आहेत.
या अधिकार्याने सांगितले की, ‘सध्याच्या परिस्थितीत हार्दिक पांड्याला संघात कायम ठेवण्याची शक्यता 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे. होय, टी-20 विश्वचषकाच्या पुढील काही सामन्यांमध्ये तो इतरांपेक्षा चांगली कामगिरी करू शकतो, परंतु तरीही संघात राहण्याची शक्यता कमी आहे. जर चार खेळाडूंना कायम ठेवले किंवा एक ींऊश् असेल तर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन हे त्या जागेसाठी मोठे दावेदार असतील.‘
हार्दिकबाबतचा हा निर्णय पूर्णपणे क्रिकेटवर आधारित आहे, कारण तो आता पूर्वीसारखा अष्टपैलू नाही. हार्दिक पूर्वी 130 किमी वेगाने गोलंदाजी करायचा, पण दुखापतीतून परतल्यानंतर तो तसे करत नाही. भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर कर्णधारपदावरुन दिल्ली कॅपिटल्स सोडू शकतो.
श्रेयस अय्यरच्या जवळच्या सूत्रांनुसार तो संघाचे नेतृत्व करण्याच्या भूमिकेसाठी उत्सुक आहे आणि दिल्ली कॅपिटल्स त्याच्याकडे पुन्हा कर्णधारपद सोपवण्याची शक्यता कमी आहे. ॠषभ पंतच्या नेतृत्वाखाली संघाने यंदाच्या आयपीएलच्या प्ले-ऑॅफमध्ये स्थान निश्चित केले होते. नवीन फ्रँचायझी संघांना लिलावापूर्वी खेळाडूंच्या पूलमधून प्रत्येकी तीन क्रिकेटपटू निवडण्याची संधी मिळू शकते. सर्व संघांना समान संधी देण्यासाठी, ँण्ण्घ् दोन नवीन फ्रँचायझी (लखनौ आणि अहमदाबाद) लिलावापूर्वी उपलब्ध पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडण्याची संधी देईल.
तो म्हणाला, ‘नवीन संघांना ’कोअर’ बनवण्याची संधी देणे हा यामागचा तर्क आहे. यात खेळाडूंची फी आणि त्या खेळाडूला लिलावात सहभागी व्हायचे आहे की नाही यावर अवलंबून आहे. बहुतेक जुन्या संघांना कायम ठेवण्याचा पर्याय असेल, त्यामुळे नवीन संघांना ही संधी मिळू शकेल.‘