समीर वानखेडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली; नवाब मलिकांचा पुर्नउच्चार
मुंबई
नवाब मलिक यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर निशाना साधला आहे. दरम्यान, त्यांनी बोलताना नीरज गुंडे या वक्तीचे नाव घेत हा व्यक्ती मागच्या सरकारचा दलाल असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व शासकीय कार्यालयात याचा मुक्त वावर असून समीर वानखेडेंसोबतही नीरज गुंडेचे संबंध असल्याचे मलिक म्हणाले.
काय म्हणाले नवाब मलिक –
राज्याचे माजी मुख्यमंत्री हे नीरज गुंडेच्या चेंबूर येथील घरी जाऊन बसत होते. ईडीच्या कार्यालयातही नीरज गुंडेचा मुक्त वावर आहे. तसेच काल टवीट केलेला फोटो हा जास्मिन वानखेडे यांच्या पतीचा आहे. ते सद्या सध्या युरोपमधील व्हेनिसमध्ये तो राहतात. यासोबतच त्यांनी समीर वानखेडे यांनी धर्मांतर केले नसून ते जन्माने मुस्लीम आहेत. मात्र त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा पुर्नउच्चारही नवाब मलिक यांनी केला.
किरीट सोमैया काय घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्या निशी घोटाळे उघड करणार आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते लोकांना तोंड दाखवू शकणार नाहीत, असा दावाही मलिक यांनी केला. तसेच दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणार्या व्यक्तीच्या पाठीशी रामदास आठवले उभे राहत असतील तर हे दुर्दैर्व आहे.