लातूरमध्ये भाजपला मोठा धक्का! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

लातूर

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक वादामुळे चांगलीच गाजत आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग-ेस पक्षाची सरशी होताना दिसत आहे. पुन्हा बँकेची एक हाती सत्ता काँग-ेसकडेच असणार आहे. 19 जागेसाठी होणार्‍या या निवडणुकीत 70 उमेदवार मैदानात होते. निवडणुकीसाठी 117 अर्ज यावेळी दाखल करण्यात आले होते. अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी केली आणि भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली. कारण अर्ज छाननीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज हे बाद ठरले. काँग-ेसच्या बंडखोर उमेदवारांचे अर्ज ही बाद ठरले होते. निवडणुकीपूर्वीच काँग-ेसची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पकड मजबूत होणार आहे हे दिसून येत आहे.

कसे झाले उमेदवारी अर्ज बाद ?

बेबाकी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे काढताना विरोधी उमेदवारांना अनंत अडचणी आल्या.

छाननीच्या दिवशीच बाकी भरल्याने भाजपच्या अनेक उमेदवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बाद ठरवला.

सहकार बोर्डाची थकबाकी असल्यासही उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलाय.

भाजपने सर्व जागा लढविण्याचा निर्णय घेत यावेळी मोर्चेबांधणी केली होती. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात आमदार रमेश कराड यावर बारीक लक्ष ठेवून होते. मात्र अर्ज सादर केल्यानंतर झालेल्या छाननीमध्ये भाजपाच्या सर्व उमेदवाराचे अर्ज बाद ठरले आहेत. यामुळे भाजपच्या गोटात प्रचंड नाराजी आहे. सत्ताधार्‍यांनी लोकशाहीचा खून केला आहे. याची तक्रार आम्ही राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडे करणार आहोत. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे तक्रार करण्यात येणार असून यात अर्ज बाद करणार्‍या सरकारी यंत्रणेच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागणार असल्याची माहिती रमेश कराड यांनी दिली आहे

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!