महिला क्रिकेट : भारत व ऑस्ट्रेलिया मल्टी फॉमेंट सीरजसाठी तयार

मकाय

भारत व ऑस्ट्रेलिया महिला संघ मंगळवार पासून येथे तीन एकदिवशीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्या बरोबरच मल्टी फॉमेंट सीरीजसाठी तयार आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दृष्टिकोणातून या दरम्यान एकदिवशीय सामन्यातील आपल्या विक्रमी विजयी अभियानाला सुरु ठेवण्यावर नजर असेल तर कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या विजयी अभियनाला थांबवून या मालिकेची सुरुवात सकारात्मक करु इच्छितो.

भारताने आयसीसी महिला विश्व कप 2017 च्या उपात्य सामन्यात स्पर्धेचा प्रबळ दावेदार समजल्या जाणार्‍या ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन स्पर्धेतून बाहेर केले होते. या पराभवानंतरही चार वर्षानंतर ऑस्ट्रेलिया संघ क्रिकेटमधील अन्य विश्व कपमधील प्रबळ दावेदाराच्या रुपात पुढे आला आहे.

भारताच्या विरुध्द उपात्य सामन्यात झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा एकदिवशीय सामन्यात एकच पराभव झाला आहे. तर त्यांनी या प्रारुपमध्ये आपले मागील 24 सामने जिंकले आहेत.

ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक अ‍ॅलिसा हेलीने सांगितले की खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये काही अदभूत प्रदर्शन झाले आहे आणि खूप प्रमाणात अजीब परिणाम आहेत. यामुळे हे माझ्यासाठी कोणतेही आश्चर्याची गोष्ट नाही की आमच्याकडे प्रतिस्पर्धाचा हा लहानसा उत्साह आहे आणि थोडयाशी प्रतिद्वंद्विता भारताच्या विरुध्द सुरु आहे.

ऑस्ट्रेलियाचे विजयी अभियान 2018 पासून सुरु आहे आणि त्यांनी यापूर्वीच्या मालिकेत भारताला 3-0 ने हरविले होते. यानंतर दोनीही संघात त्याच वर्षी टि-20 विश्व कपमध्ये सामना झाला होता आणि भारताने ऑस्ट्रेलियाला उपात्य सामन्यात पराभूत केले होते. मात्र या पराभवानंतरही त्यांनी हा कप जिंकला होता. .

याच्या दोन वर्षानंतर 2020 मध्ये टि-20 विश्व कपमधील सलामीचा सामना भारत व ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला होता. ऑस्ट्रेलियाने एमसीजेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारताला 85 धावाने पराभूत केले होते. या नंतर पासून भारत व ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात कोणताही सामना खेळला गेलेला नाही.

मात्र दोनीही संघात मागील आठवडयात सराव सामना खेळला गेला होता. दोनीही संघात तीन एकदिवशीय सामन्यांच्या मालिके व्यतिरीक्त गुलाबी चेंडूने एक दिवय-रात्रीचा कसोटी सामना आणि तीन टि-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!