कधी एकेकाळी प्रेमात आकंठ बुडालेल्या ’या’ मराठमोळ्या जोड्यांमध्ये आज कायमच दुरावा
मुंबई,
पडद्यावर एकत्र झळकणारे कलाकार खर्याखुर्या आ?ुष्यात एकत्र येताच चाहत्यांच्या आनंदाला उधाण येतं. पण, याच कलाकारांमध्ये सारंकाही सुरळीत सुरु आहे असं वाटत असतानाच त्यांच्या नात्यात दुरावा आला, की चाहत्यांना विश्वास ठेवणंही कठीण होऊ जातं. मराठी कलाविश्वात अशाच काही जोड्यांचं एकत्र येणं आणि त्यांचं वेगळशं होणं चाहत्यांना धक्का देऊन गेलं.
सुयश टिळक, अक्षया देवधर- सुयश आणि अक्षयाच्या सोशल मीडिया पोस्ट आणि एकमेकांसोबत त्यांनी व्यतीत केलेला काळ कायमच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत होता. त्यांच्या नात्यात आलेला दुरावा एका वळणावर इतका वाढला की, त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
मिताली मयेकर, श्रेयस राजे- मिताली तिच्या नाटकाच्याच मंडळींपैकी एकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. या व्यक्तीचं नाव आहे, श्रेयस राजे. श्रेयसही एक अभिनेताच आहे. काही महिन्यांपलीकडे त्यांचं हे नातं तग धरु शकलं नाही.
अनिकेत विश्वासराव, पल्लवी सुभाष- जवळपास आठ वर्षे एकत्र असणार्या अनिकेत विश्वासराव आणि पल्लवी सुभाष यांचं वेगळं होणं चाहत्यांना धक्का देऊन गेलं. परस्पर सामंजस्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्ण? घेतला.