पालकमंत्री धनंजय मुंडे आज पुन्हा अतिवृष्टीने बाधित क्षेत्राच्या पाहणीसाठी शेतीच्या बांधांवर

मृतांच्या नातेवाईकांस प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीचे धनादेश वितरित; मुलांच्या शिक्षणालाही मदत करण्याचा धनंजय मुंडेंचा शब्द

 बीड,

 जिल्ह्यात अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, नदीचे पात्र बदलून शेतात शिरले, अगदी दगड गोटे शेतात वाहून आले तर शेतातली माती खरडून वाहून गेली, याबाबत पिकांचा विमा व खरडून गेलेल्या जमिनीलाही मदत देण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी राज्य सरकार कडे केली असल्याचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री धनंजय मुंडे हे आज अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा, केज तालुक्यातील उंदरी, अरणगाव आदी गावांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नदी काठच्या शेतांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच शासनाकडून लवकरच या सर्व नुकसानीची मदत मिळणार असल्याचेही त्यांनी पठाण मांडवा येथील शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

यावेळी पालकमंत्री श्री मुंडे यांच्या सह जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मा.आ. पृथ्वीराज साठे, दत्ता आबा पाटील, राजपाल लोमटे, ताराचंद शिंदे, बाळासाहेब शेप, तानाजी देशमुख, रणजित चाचा लोमटे, बाळासाहेब सोनवणे, राजाभाऊ शेप, सुधाकर जोगदंड, अंबाजोगाईचे तहसीलदार विपीन पाटील, महावितरणचे कार्यकारी अभियंता वाघमारे, यांसह कृषी आदी विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 पुरात वाहून मृत्यू झालेल्या सोनवणे व सिरसाट कुटुंबियांचे सांत्वन

दरम्यान केज तालुक्यातील उंदरी येथील महादेव बळीराम सोनवणे व उत्तम बन्सी सोनवणे तसेच आरंबगाव येथील बालाजी सिरसाट यांचे पुराच्या पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी निधन झाले होते. आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या तीनही कुटुंबियांची भेट घेऊन सोनवणे व सिरसाट परिवारांचे सांत्वन केले.

यावेळी राज्य शासनाच्या वतीने तीनही कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपये मदतीचा धनादेश ना. मुंडे व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

या तीनही कुटुंबातील नातेवाईकांशी धनंजय मुंडे यांनी चर्चा करत त्यांच्या भविष्यातील निर्वाह, घरांची पडझड दुरुस्ती तसेच त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचाही शब्द दिला आहे.

यावेळी जि. प. उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, मा.आ. पृथ्वीराज साठे, नंदकुमार मोराळे, रत्नाकर शिंदे, विष्णू भाऊ चाटे, सारंग आंधळे, बालाजी तांदळे, चंदू चौरे, शिवलिंग मोराळे, संजय धस, सुरेश घुले, दादा चाटे, अझहर इनामदार, यांसह विभागीय अधिकारी शरद झाडके, केजचे तहसीलदार श्री. मेंडके, नायब तहसीलदार श्री. धस यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे आज घेणार जिल्ह्याचा आढावा

जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसाने नुकसानीची आकडेवारी बदलत आहे, शेती, पशुधन, घरे, रस्ते, पूल याबाबरोबरच ठिककठिकानी जीवितहानी देखील झाली आहे. त्यामुळे नुकसान व आणेवारी याचा एकूण समन्वय साधून सरसकट मदत देण्याची आता गरज आहे व यासाठी जिल्ह्यातील झालेले एकूण नुकसान, शेतकऱ्यांना विशेष अर्थसहाय्य व भविष्यातील नुकसान रोखण्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजना याबाबत जिल्हा स्तरावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व सर्व विभागातील अधिकाऱ्यांची आज दुपारी नंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक बीड येथे आयोजित करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!